Saturday, November 06, 2010

कृष्णछाया

दीस मावळला आता त्यात हरवली वाट
शोधे देवकीचा देव कान्ह्यासाठी एक घाट

दीस निवळला आता त्यात हरवली जाग
राख गोकुळाच्या मनी, आग उद्धवाचा राग

दीस झाकोळला आता त्यात हरवली राधा
सावळ्याच्या आठवांची वेडीखुळी भूतबाधा

दीस गढूळला आता त्यात हरवले रान
श्याम कात-चुन्याविना मीरा काजळले पान

दीस आकळला आता त्यात हरवली आस
होतो अर्जुनाच्या मनी कर्तेपणाचा निरास


मंदार.

6 comments:

Milind Gadre said...

सुंदर :)

Bipin said...

are faar surekh!!

Gayatri said...

^:)^
खूप सुरेख! मी्रा काजळले पान! शेवटचं कडवं खूऽऽऽप आवडलं.

Mandar Gadre said...

:-) धन्यवाद!

Saee said...

Khup sundar. Saglech shabd sundar ahet. :)

Anonymous said...

Hi.. vachata vachata kahi related oli suchalya ahet.. in case of any changes, suggestions pls..

दीस आसावला आता त्यात हरवला नाद
शोधे माय यशोदेची कान्हा आतुरली साद

दीस भंगला आता त्यात हरवला मान
कृष्णा असून तुडवे रोज नित्य नवे रान

दीस अंधारला आता त्यात हरवला कर्ण
कान्हा भेटवी कुंतीला, कसा बदलला वर्ण

दीस पेटला आता त्यात हरवली गीता
सारी यादवी माजली,कशी भंगली शांतता

दीस हरवला आता त्यात हरवला "लल्ला"
होता विसावला थोडा, घाव वर्मी हो लागला