Sunday, December 03, 2006

अब्द अब्द मनी येते ..

अब्द अब्द मनी येते सखे तुझी आठवण,
तुझ्या केसांतली फुलं, पावलातले पैंजण

तुझा गंध माझा वारा, तुझा चांद माझा तारा,
तू सूर बासरीचा, मी त्या पावसाच्या धारा

माझ्या पणतीची वात तू ठोका काळजात,
बाहुली माझी, तू माझिया डोळ्यात

वाटेवरचा माझ्या तू प्राजक्ताचा सडा,
दोघांच्या शाळेतला एक वेडावणारा धडा

-- मंदार.

Wednesday, November 29, 2006

कुछ बना-बिगड़ा ...

हमेशा कि तरह, आज भी समंदर किनारे बैठा था वो । याद कर रहा था किसी को, जो उसे भुलाकर कहीं दूर चली गई थी । रेत में यूं मायूस बैठे बैठे उसे याद आया एक अजी़ज़ दोस्त ने सुनाया हुआ एक शेर -

"समंदर किनारे बैठ यूंही रेत में फेर रहा था उंगलियां,
गौर से देखा तो तेरी तस्वीर उभर आयी थी .. "


आह!
उस दिल से निकली आह का कुछ ये बन गया:

हाय! खू-ए-दिल मेरा प्यार बन गया
हाय! खून-ए-दिल खू-ए-यार बन गया

जब खो गया सपना, अश्कबार बन गया
उस ग़म में ये जहां एक मझार बन गया

हाल-ए-दिल छुपाया तो हम 'बदमाश' हो गये,
जो किया इजहार तो मैं गुनहगार बन गया

वो दिन था कि चली थी नसीम चमन में,
एक ये दिन है कि नफस तूफान बन गया

-- मंदार.

[खू = आदत; अश्कबार = अश्क बहानेवाला;
मझार = कब्र; नसीम = सुहानी हवा; नफस = सांस]

Sunday, November 26, 2006

माझ्यातल्या तुला ..

ते चाफ्याचं फूल.
तुझी नाजुकशी वेणी.
त्या माळरानावरचा पावा.
तो दूर डोंगरातला झरा.
थांबलेला चातक पक्षी.
मग वळवाचा पाऊस.
तोच मातीचा वास.
ती उबदार शेकोटी.
तुझ्या ओढणीवरची नक्षी.
त्या आभाळाची निळाई.
तीच टेकडीमागची आमराई.
तुझा गोंडस चेहरा.
तेच निरागस हसू.
उधाणलेला समुद्र.
हलकं हलकं मन.
तू दिलेलं मोरपीस.

काय आठवू, काय नको .. ?

मुकं मन, रितं मन.
भरलं मन, रडलं मन.
राहिलो मी, गेलीस तू.
तुझा मी, तुझीच तू.

देशील ते क्षण, जे मला कधी मिळालेच नाहीत .. ?
नाहीतर, फक्त एवढं कर - मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडू दे.

मला .. पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय !
तुझ्याच .. पुन्हा एकदा प्रेमात पडायचंय !

तोच जोश, तेच वेड, तोच एक थरार,
पुन्हा एक वादळ मला माझ्यात उठवायचंय !

तीच पहिली नजरानजर, तोच पहिला स्पर्श,
निसटलेल्या क्षणांना पुन्हा भरभरून जगायचंय !

काळोखात रातराणी, आलीस माझ्या स्वप्नात,
तेच स्वप्न पुन्हा एकदा जागेपणी पाहायचंय !

Friday, November 10, 2006

पाडलेले शेर :P

हम वो भंवरे नही जो चखने मय निकले,
उन आंखों से पीते हैं जिन आंखों पे दम निकले

कभी तो नजर को फेर हमें देख ले जालिम,
कभी तो उन आंखों से नोश-ए-रहम निकले

हंसता है ये जमाना हमारी इस वहशत पे,
बेपर्वाह हैं हम जो वो ऐसे बे-शरम निकले

Sunday, October 29, 2006

ना लिख पाऊंगा हर्फ़-ए-इश्क तुझको मैं कभी,
सोचा लिख देता हूं कोई एक ग़ज़ल ही सही


तेरा साथ ना हुआ हासिल तेरी यादें ही सही,
तेरा हाथ न है हाथ में, तेरा एहसास ही सही

बारिश की राह तकती आंख में भर गये आंसूं,
गूंजते बादलों के साथ वो अकेली शाम ही सही

क्या बात अगर तुझे कभी पा न सकूंगा मैं
तेरे आशिकों कि शुमार में मेरा नाम ही सही

आंखें न देख सकती तुझे, न ये कान सुनते हैं,
"तू है, यहीं कहीं" दिल में ये एक खयाल ही सही

माना मेरे नसीब में नही है तेरे लब का जाम
तेरी जुबां पे उस रोज आया हुआ मेरा नाम ही सही

न बन सका तेरा आशिक, तेरा मजनू, तेरा बालम
तेरे चाहनेवालों में से मैं एक कोई 'बेनाम' ही सही

मीर आणि काफ़िर

एका शांतशा संध्याकाळी, जगजित सिंगांच्या आवाजातली माझी एक आवडती ग़ज़ल ऐकत होतो.

"पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने हैं
जाने न जाने गुल ही न जाने, बाग तो सारा जाने हैं"
...अप्रतिम !

ही ग़ज़ल लिहिली होती मीर तकी मीर यांनी. 18 व्या शतकातले मोठे शायर. मिर्झा़ असदुल्लां खां गा़लिब सारख्यांनी मीर यांच्या शायरीचा आदराने उल्लेख केला आहे, मीर यांना उर्दू शायरीचे 'ईमाम' मानून. गुलजारनी बनवलेल्या "मिर्झा गा़लिब" या दूरदर्शनवरच्या मालिकेत तसा एक प्रसंगही दाखवला आहे. मीर यांचा हा शेर ऐकून गा़लिब उद्गारले होते:

"रेख्ते के तुम ही एक उस्ताद नही हो गा़लिब,
कहते हैं अगले जमाने में कोई मीर भी था"

मीर यांचा आणखी एक शेर वाचला काही दिवसांपूर्वी :

"सख्त काफ़िर था जिसने पहले 'मीर',
मज़हब-ए-इश्क़ इख़्तियार किया .. "

'काफ़िर'या कल्पनेवर विचार करताना माझ्या मनात आलं,

"पथ्थर के बूतों के दीवाने होते हैं काफ़िर,
ना बूतों में जान हैं ना जिगरवाले हैं काफ़िर"

आणि, मजहब-ए-इश्क यावरच बोलायचं झालं तर,

"फ़र्क न है मजहब-ए-इश्क में मालिक-बन्दे का,
गो कत्ल करता है मालिक, सीने से भी लगाता है"

Monday, February 27, 2006

मन माझे ..

मन माझे अवखळ, जसा झरा खळखळ,
नाही साचणे कुठेही, मस्त धावणे फेसाळ.

मन माझे मन माझे, चमकता काचखडा,
कधी फुटतो तुटतो, जातो अंगभर तडा.

मन माझे रानवारा, जसा वाहतो बेभान,
कधी झुळूक हवीशी, कधी भीषण तूफान.


मंद समईसारखे, मन माझे तेवणारे,
कधी होते रे विखारी, ते निखारे जळणारे.

स्वतःभोवती हे फिरे, मन माझे रे भोवरा,
धुंद आपल्या गतीत, गिरक्या घे गरगरा.

मन माझे आर्द्र घन, जसा नभी दाटलेला,
शतधारांनी करितो, ओलीचिंब या मातीला.

मन गवताची पाती, वाऱ्यावर डुलणारी,
कधी होते धारदार, तलवार ते दुधारी.

मन माझे काळी माती, मन सुपीक धरणी,
मळे फुलती स्वप्नांचे, वेड्या मनाची करणी.

मन रहाटगाडगे, जसे विहिरीवरचे,
कधी भरे काठोकाठ, रिक्त पुन्हा घट याचे.

इंद्रधनुष्य जसे की, ह्याचे अगणित रंग,
आणि जगाहून साऱ्या, याचा वेगळाच ढंग.

शांत सागरासारखे, मन माझे हे अथांग,
सुखदुःख भाव सारे, वरवरचे तरंग.


-- मंदार.

एका लग्नाची गोष्ट

सुप्रभाती रोज जाई कर्ण गंगेच्या जळी,
अर्घ्य देई सूर्यदेवा रिक्त करि तो ओंजळी.

दान अर्घ्यांचे तयाचे आणि सूर्याराधना,
व्रतीसमान चालती कधीच त्यास खंड ना.

परन्तु एका प्रभाती क्रम तयाचा मोडिला,
"वाचवा! बुडते जळी !" आक्रोश त्याने ऐकिला.

गंगेवरी पाणी भराया ललना कुणी आली असे,
पडून तोल जाउनी मग दूर वाहत जातसे.

कानी पडे ती साद अन् क्षणही न कर्ण दवडि तो,
युवतीला वाचवुनी काठांवर आणि तो.

खोल पाण्याच्या भयाने हरपली शुद्धी जिची,
हळूच घाटावर नदीच्या ठेवि तो काया तिची.

युवती, अति सुन्दरशी, कर्ण पाहत राहिला,
क्षणकाल ते अर्घ्यदान, साधना तो विसरला.

आणुनी निमिषात अपुले उत्तरीय कोरडे,
पुसण्या मुख हळुच तिचे, कर्ण तेथे धडपडे.

जाग स्पर्शाने तयाच्या, सुन्दरीला येतसे,
पाहुन राजस रूप त्याचे लाजुन ती हासतसे.

एक क्षण कर्णास वाटे सर्व सृष्टी थांबली,
होता दृष्टादृष्ट त्यांची, गंगाही मनि हासली !

पळभरातच कन्यका ती येतसे भानावरी,
मंदसे स्मित मग करून निघुन जाई सत्वरी.

"अरे! उत्तरीय माझे, घेऊन गेली सुन्दरी!
काय म्हणतिल, परत जाता, लोक हस्तिनापुरी?"

'वृषाली' असे ती कुमारी सूतकन्या लाघवी,
कर्णपत्नी होतसे मग, अंगराज्ञिपद भूषवी.

कर्णाचे पण 'तोपर्यंत' लक्ष नाही लागले,
मुख वृषालीचेच त्या, रविबिंब भासू लागले !

-- मंदार.

( शिवाजीराव सावंतांच्या "मृत्युंजय" मधल्या परिच्छेदावर आधारित )

प्रेमाची चारोळी ;)

जीव जिच्यावर जडला माझा, ती मुळी मज पाहि ना,
ज्यावर ती अनुरक्त हो, तिज तो विरक्त जवळी घेइ ना,
प्राण ओवाळुनी टाकि कुणि अन्य मजवरि कन्यका,
ती, तो, मी, ही, मदनाचाहि धिक्कारच करि मी रसिका ..

-- मंदार.

(एका संस्कृत सुभाषिताचा अनुवाद)

स्मरण कुसुमाग्रजांचे

आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. १९४२ च्या लढ्यात "गर्जा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे कुसुमाग्रज. नटसम्राट सारखं नाटक ज्यांच्या लेखणीतून उतरलं, ते कुसुमाग्रज. एका बाजूला दिसतात कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे गर्वगीत, मातीची दर्पोक्ती अशा कविता तर दुसरीकडे कालिदासाच्या मेघदूतातल्या रचनांवर आधारित कविता. त्यांनी लिहिलेलं वाचण्याचा आनंद नाही सांगता यायचा शब्दात. इथे त्यांच्या कवितांचा संग्रह तुम्ही पाहू शकाल.

"चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला ! "

Sunday, February 26, 2006

ऊन ..

सकाळचं सुरेख कोवळं ऊन पडलंय. माझ्या बाल्कनीमधून हळूच आलंय आत. या कोवळ्या उन्हानं मला पहिल्यापासूनच वेड लावलं आहे. पुण्यातल्या आमच्या जुन्या वाड्यातल्या घरी आंघोळ करून झाल्यावर कोवळ्या उन्हात उभं राहायचो ते आठवतंय अजून. इतकी वर्षं मनात घर करून बसलेलं हे ऊन, माझ्या पामराच्या शब्दात -