Monday, July 28, 2008

तीन तिघाडा

घशाखाली भाकरी घालून तो जरा पडला
ती बाहेर उन्हात गोव-या वाळवत होती

तीच वाळली, गोव-या ओल्या आणि तो कोरडा राहिला.

----------------

बहात्तर कुमारिकांपायी पडतायत
रोज असंख्य जीवांच्या आहुती

ते यज्ञ कधीपासून करायला लागले?

-----------------

सीतेसंगे स्वर्ग भासे वनवास रामाचा
कर्तव्या जागुन आत्मा होई धन्य लक्ष्मणाचा

प्रासादी राहुन वनवास होता - फक्त उर्मिलेचा



मंदार.

2 comments:

Harshada Vinaya said...

सीतेसंगे स्वर्ग भासे वनवास रामाचा
कर्तव्या जागुन आत्मा होई धन्य लक्ष्मणाचा

प्रासादी राहुन वनवास होता - फक्त उर्मिलेचा

हे खूप पटले, नेहमीच वाटायंचं..
उर्मिला तशी दूर्लक्षीतच राहीली.. त्यामूळे तिच्या वेदना पोहोचल्याच नाहीत, आपल्यापर्यंत..

Milind Gadre said...

bhari!!

Pahilya navhtya ka kay adhi athvat nahi, khupach surekh banlya ahet TriveNi !